जिल्ह्यात उद्यापासून ‘नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’

  77

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशद्वारांवरच प्रत्येक नागरिकाचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला गुरूवार२३ डिसेंबरपासून लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे हेल्मेटप्रमाणेच आता कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल तर पेट्रोल-डिझेलसारखे इंधनही मिळू शकणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



कोरोनाला अटकाव करण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हाच आश्वासक पर्याय आहे. परंतु, वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे अशा नागरिकांप्रति अहसकाराचे धोरण अवलंबण्याचा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत ‘नो व्हॅक्सिन, नो एंट्री’चा निर्णय घेतला. गुरुवारपासून या निर्णयाची शहरासह जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, खासगी आस्थापना-कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, सिनेमागृहे, लॉन्स, मंगलकार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमात लसीकरण प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य ठरणार आहे.


शहरात पोलिस आयुक्तांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम प्रभावीपणे राबविली आहे. परंतु, आता जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार लस घेतली नसेल, तर पंपावर पेट्रोल-डिझेल यांसारखे इंधनही मिळणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा बोलबाला होता. परंतु, आता जिल्ह्यात ‘नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल’ हा चर्चेचा विषय ठरणार आहे. लस घेतली नसतानाही प्रवेश दिला गेल्यास संबंधित नागरिकासह आस्थापनेचे अधिकारी, व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.


तसेच, संबंधित आस्थापनेमध्ये येणाऱ्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतला आहे का, याची खात्री करण्याची जबाबदारी त्या आस्थापना प्रमुखाची असेल. त्यामुळे कार्यालये, व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रवेश देताना लसीकरणाबाबत शहानिशा करण्याची जबाबदारी संबंधितांनी पार पाडणे बंधनकारक असणार आहे. यात कसूर केली तर २७ नोव्हेंबरच्या निर्णयानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना पाचशे रुपये तर, संबंधित आस्थापनेला दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ