मोखाडा: मतदान शांततेत

मोखाडा :अतिशय चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या मोखाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी महिला ३ हजार २२ व पुरुष २ हजार ८२५ पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला असून एकूण ५ हजार ८४७ महिला पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला. या निवडणुकीत एकूण ८४ टक्के मतदान झाले.


सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली व ५.३० वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त बजावला असून किरकोळ भांडणे वगळता ही निवडणूक शांततेत पार पडली.या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीमच्या आत बंदिस्त झाले असून शिवसेना, भाजप, जिजाऊ संघटना, राष्ट्रवादी, बविआ, मित्रपक्ष यांच्यामध्ये चुरशीच्या लढत आहे. तथापि, कोणता उमेदवार विजय खेचून आणतो व मतदार सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात देतात, यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.


या निवडणुकीसाठी एक पोलीस उपअधीक्षक, ७० पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या एका प्लाटोनिकचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीसाठीची मतदानप्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. तथापि, उमेदवारांसह मतदारांनाही १९ जानेवारीच्या निकालाची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता