जव्हारच्या जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट

पारस सहाणे


जव्हार : जव्हारच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या जुन्या राजवाड्याची वास्तू व परिसर बकाल बनला असून नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे येथे गर्दुल्ले, चरसींचा वावर असतो. नगारखान्यावर झाडे उगवली आहेत, त्याची तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत आहे. जुना राजवाडा भग्नावस्थेत पाहावयाला मिळतो. राजवाड्याची इमारत दुमजली असून तिथे काही वर्षे भारती विद्यापीठ व नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय होते.



राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोड्यांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारही दिशांनी असणारे बुरुज असे वैभव या राजवाड्याचे होते. सुमारे २१,००० चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाट्यगृह, शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याचे उंच जलकुंभ अशा नागरी सुविधांसाठी या राजवाड्याच्या इमारतींचा वापर केला जातो. ही ऐतिहासिक वास्तू असल्याने पुरातत्व खात्यानेही इकडे द्यावे, अशी मागणी जव्हारवासीय करत आहेत.



या परिसरातील कारागीर आणि जव्हारजवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला. पुढे राजे कृष्णशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा नगारखाना, गणपती मंदिर व अनेक खोल्यांचा विस्तार केला. आज जव्हारच्या इतिहासाताची साक्ष देणाऱ्या जव्हारमधील जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट झाली आहे. जीर्णोद्धार होत नसल्याने तटबंदी व इमारत अखेरची घटका मोजत आहे.



जव्हार नगरपरिषदेने नुकतेच शंभर वर्षे पूर्ण करण्याचा मान मिळवला असला तर आजही जव्हारमधील जनता विकासाची वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांत शेकडो कोटी रुपये निधी उपलब्ध होऊनसुद्धा जुन्या राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने जव्हारकर संताप व्यक्त करत आहेत.



त्यामुळे सत्ताधारी जरी कोट्यवधी रुपये निधी आणला असे म्हणत असले तरी मात्र सत्ताचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत, तरीही एकही विकासकाम पूर्ण झाले नाही हे वास्तव आहे.






पहिला राजवाडा हा खरा २६१ वर्षांपूर्वीचा



नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपला ऐतिहासिक असा जुना राजवाडा जव्हार नगरपरिषदेला भेट दिला. हल्लीचा जुना राजवाडा या परिसरात सन १७५० साली कृष्णा राजांनी बांधला होता. दुर्दैवाने ७२ वर्षांनी सन १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर सन १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाड्याचे बांधकाम, आपला मुलगा पतंगराहा याला राजगादीवर बसवून त्यांच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले.




राजे यशवंतराव मुकणे यांनी मोफत दान केला



जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी आपल्या मालकीच्या खूप वास्तू जव्हार नगरपरिषदेस दान स्वरूपात दिल्या. मुकणे यांनी जव्हार नगरपरिषदस मोफत जुना राजवाडा दान केला. मात्र, जव्हार नगरपरिषदेने आजवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने सदर ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहेत. जव्हार नगरपरिषदेने या राजवाड्याच्या विकासासाठी आदिवासी सृष्टी तिथे निर्माण करणार असल्याचे समजते. मात्र, त्याला आजपर्यंत राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम