जव्हारच्या जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट

पारस सहाणे


जव्हार : जव्हारच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या जुन्या राजवाड्याची वास्तू व परिसर बकाल बनला असून नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे येथे गर्दुल्ले, चरसींचा वावर असतो. नगारखान्यावर झाडे उगवली आहेत, त्याची तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत आहे. जुना राजवाडा भग्नावस्थेत पाहावयाला मिळतो. राजवाड्याची इमारत दुमजली असून तिथे काही वर्षे भारती विद्यापीठ व नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय होते.



राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोड्यांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारही दिशांनी असणारे बुरुज असे वैभव या राजवाड्याचे होते. सुमारे २१,००० चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाट्यगृह, शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याचे उंच जलकुंभ अशा नागरी सुविधांसाठी या राजवाड्याच्या इमारतींचा वापर केला जातो. ही ऐतिहासिक वास्तू असल्याने पुरातत्व खात्यानेही इकडे द्यावे, अशी मागणी जव्हारवासीय करत आहेत.



या परिसरातील कारागीर आणि जव्हारजवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला. पुढे राजे कृष्णशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा नगारखाना, गणपती मंदिर व अनेक खोल्यांचा विस्तार केला. आज जव्हारच्या इतिहासाताची साक्ष देणाऱ्या जव्हारमधील जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट झाली आहे. जीर्णोद्धार होत नसल्याने तटबंदी व इमारत अखेरची घटका मोजत आहे.



जव्हार नगरपरिषदेने नुकतेच शंभर वर्षे पूर्ण करण्याचा मान मिळवला असला तर आजही जव्हारमधील जनता विकासाची वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांत शेकडो कोटी रुपये निधी उपलब्ध होऊनसुद्धा जुन्या राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने जव्हारकर संताप व्यक्त करत आहेत.



त्यामुळे सत्ताधारी जरी कोट्यवधी रुपये निधी आणला असे म्हणत असले तरी मात्र सत्ताचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत, तरीही एकही विकासकाम पूर्ण झाले नाही हे वास्तव आहे.






पहिला राजवाडा हा खरा २६१ वर्षांपूर्वीचा



नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपला ऐतिहासिक असा जुना राजवाडा जव्हार नगरपरिषदेला भेट दिला. हल्लीचा जुना राजवाडा या परिसरात सन १७५० साली कृष्णा राजांनी बांधला होता. दुर्दैवाने ७२ वर्षांनी सन १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर सन १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाड्याचे बांधकाम, आपला मुलगा पतंगराहा याला राजगादीवर बसवून त्यांच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले.




राजे यशवंतराव मुकणे यांनी मोफत दान केला



जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी आपल्या मालकीच्या खूप वास्तू जव्हार नगरपरिषदेस दान स्वरूपात दिल्या. मुकणे यांनी जव्हार नगरपरिषदस मोफत जुना राजवाडा दान केला. मात्र, जव्हार नगरपरिषदेने आजवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने सदर ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहेत. जव्हार नगरपरिषदेने या राजवाड्याच्या विकासासाठी आदिवासी सृष्टी तिथे निर्माण करणार असल्याचे समजते. मात्र, त्याला आजपर्यंत राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील