सिंधुदुर्गातील चारही नगर परिषदांमध्ये शिवसेनेचा उडणार धुव्वा

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चारही नगर परिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याच ताब्यात राहणार आहेत. आम्ही या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. या बळावर आम्ही चारही नगर परिषदा जिंकणार आहोत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठासून सांगितले.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांवरून रविवारी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चारही नगर परिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याच ताब्यात राहणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे’, असा ठाम विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘आम्ही या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. या बळावर आम्ही चारही नगर परिषदा जिंकणार आहोत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठासून सांगितले.


वेंगुर्ला नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री राणे हे आले होते. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ‘त्यांनी यावे आणि या आमच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदा घेऊन जाव्यात, असे व्हायला काय आम्ही डोळे मिटून बसलो आहोत का?’, असा सवालच राणे यांनी उपस्थित केला. ‘शिवसेनेची ताकद काय आहे, चारही नगर परिषदा आमच्याकडे आहेत. त्या आमच्याकडेच राहणार. या निवडणुकांमध्ये सेनेचा धुव्वाच उडणार आहे’, असे राणे म्हणाले.


वेंगुर्ला नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावरही भाष्य केले. आमचे मित्र दीपक केसरकर हे मला आत्ताच ऑनलाइन दिसले; परंतु ते अशा प्रकारच्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये येत नाहीत, असे सांगतानाच आम्ही विकासाच्या कामात कधीही राजकारण पाहत नाही, असा टोलाही राणे यांनी केसरकर यांना लगावला.


‘आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा हे आम्ही निवडून आल्यानंतर ठरवलेले होते. विमानतळाचे काम, मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अशी कामे आम्ही केली. या कामांशी तुमचा काय संबंध होता? तुम्ही कधी होतात?, या सर्व कामांचे आम्ही भूमिपूजन केले आहे. त्यालाही यांनीच विरोध केला. आता विमानतळही सुरू झाले आहे. तेव्हा आता हे म्हणतात की, ते आम्हीच तयार केले’, अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली.
-----------------

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात