सिंधुदुर्गातील चारही नगर परिषदांमध्ये शिवसेनेचा उडणार धुव्वा

  69

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चारही नगर परिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याच ताब्यात राहणार आहेत. आम्ही या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. या बळावर आम्ही चारही नगर परिषदा जिंकणार आहोत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठासून सांगितले.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांवरून रविवारी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चारही नगर परिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याच ताब्यात राहणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे’, असा ठाम विश्वास नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘आम्ही या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. या बळावर आम्ही चारही नगर परिषदा जिंकणार आहोत’, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठासून सांगितले.


वेंगुर्ला नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री राणे हे आले होते. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ‘त्यांनी यावे आणि या आमच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदा घेऊन जाव्यात, असे व्हायला काय आम्ही डोळे मिटून बसलो आहोत का?’, असा सवालच राणे यांनी उपस्थित केला. ‘शिवसेनेची ताकद काय आहे, चारही नगर परिषदा आमच्याकडे आहेत. त्या आमच्याकडेच राहणार. या निवडणुकांमध्ये सेनेचा धुव्वाच उडणार आहे’, असे राणे म्हणाले.


वेंगुर्ला नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावरही भाष्य केले. आमचे मित्र दीपक केसरकर हे मला आत्ताच ऑनलाइन दिसले; परंतु ते अशा प्रकारच्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये येत नाहीत, असे सांगतानाच आम्ही विकासाच्या कामात कधीही राजकारण पाहत नाही, असा टोलाही राणे यांनी केसरकर यांना लगावला.


‘आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा हे आम्ही निवडून आल्यानंतर ठरवलेले होते. विमानतळाचे काम, मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अशी कामे आम्ही केली. या कामांशी तुमचा काय संबंध होता? तुम्ही कधी होतात?, या सर्व कामांचे आम्ही भूमिपूजन केले आहे. त्यालाही यांनीच विरोध केला. आता विमानतळही सुरू झाले आहे. तेव्हा आता हे म्हणतात की, ते आम्हीच तयार केले’, अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली.
-----------------

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण