ठाकरे सरकारची शिवभोजन योजना बंद पडणार!

  127

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे (Shivbhojan Kendra) अनुदान रखडल्याने राज्यातील शिवभोजन केंद्र संचालक अडचणीत आले आहेत. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते. मात्र, हळूहळू यातील अनुदान बंद होत गेल्याने संचालकांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. तातडीने यावर उपाय न शोधल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण होणार आहे.


ही योजना बंदच पडणार होती. कारण शेतकरी- विद्यार्थी आणि राज्यातील सर्वच घटकांना या सरकारने कुठलाही दिलासा दिलेला नाही. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर टीका करताना राज्यात सरकार आहे का?असा प्रश्न विचारला आहे.


आधीच कोरोना काळात राज्यातील जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. हजारो हातांना काम उरलेले नाही. त्यातच गरीब गरजू घटकांना आवश्यक असलेली ही योजना बंद झाल्यास गरीब-गरजू नागरिकांची मोठी अडचण होणार आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या