मुंबईत स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट

  96

मुंबई : मुंबईत (Mumbai) गारवा जाणवू लागला आहे. अशातच शनिवारी रात्री चेंबूरमधील (Chembur) काही लोकांना स्नो-फॉल (Snow fall) सारखा भास होईल, अशा प्रकारचा अनुभव आला. पण हा स्नो फॉल नसून पावडर-फॉल्ट असल्याचे अखेर समोर आले. यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पावडर (Powder) सदृश्य पावसाचे घटक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचेही पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले.


चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएलच्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली आहे. विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. त्यामुळे इथल्या नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली होती. पावडरमुळे शरीरास धोका निर्माण होईल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली होती. गव्हाणगावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाक्यांवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता. पण हा बर्फाचा थर नसून पावडर असल्याचं नंतर समोर आलं.


दरम्यान, भयभीत झालेल्या लोकांनी लगेचच पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड, स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनाची माणसं तत्काळ दाखल झाली. त्यांनी या सगळ्याची प्राथमिक पाहणी करुन नेमकं असं कशामुळे झालंय, याचा शोध घेतला. तेव्हा एचपीसीएलच्या एका प्लांटमधून कॅटालिस्ट पावडरची गळती झाल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आलं. दरम्यान, ही पावडर विषारी नसल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली. तरिही खबरदारी म्हणून या पावडरची चाचणी केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय. तसंच गळतीबाबत जर हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीवर कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे कंपनीनं झाल्या प्रकाराबाबत माफी मागावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून