मास्टर ब्लास्टरने केला वाहतूक पोलिसांना सलाम

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने वाहतूक पोलिसांचं मनापासून कौतुक केलं आहे.


सचिनने फेसबुकवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रीणीचा भीषण अपघात झाला. देवाच्या कृपेने ती आता बरी आहे. मात्र, त्यावेळी एका वाहतूक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच ती आता बरी आहे. अपघातानंतर त्याने ताबडतोब प्रसंगावधा दाखवत तिला ताबडतोब ऑटोमध्‍ये बसवत रुग्णालयात नेले. ज्यानंतर मी स्वत: जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले. त्यांच्यासारखे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत, जे कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करतात. अशा लोकांमुळेच जग सुंदर आहे. जेव्हा तुम्ही अशा लोकांना, विशेषत: जनतेची सेवा करणाऱ्यांना भेटता तेव्हा आवर्जून त्यांचे आभार मानायला थोडा वेळ द्या. आपल्याला कदाचित माहित नसेल, पण असे अनेकजण कोणताही गाजावाजा न करता आपली मदत करत असतात आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण भारतातील वाहतूक पोलिसांसाठी, लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण एकमेंकासाठी वाहतूक नियमांचा आदर करूया आणि शॉर्टकट नको वापरुया. कारण दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून स्वत:चा थोडा वेळ वाचवणे योग्य नाही. 


नेटकरांनी सचिनच्या या पोस्टच कौतुक करत त्यावर लाईक, शेअर आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला