विकासात्मक काम घेऊनच जनतेकडे जाणार : निलेश राणे

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात आमच्या नगरसेवकांनी आणि उत्कृष्टरित्या विकासात्मक व पारदर्शक काम केले आहे व हे विकासात्मक, पारदर्शक कामच घेऊन आम्ही येथील जनतेकडे जाणार असून तेराही जागांवर आमचे नगरसेवक निवडून येणार असल्याचा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.



निलेश राणे यांच्या हस्ते भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निलेश राणे म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकार तसेच येथील विरोधकांकडे आता काहीच मुद्दे नाहीत, विकास कामे केली नाहीत. त्यामुळे विरोधक खोट्या थापा मारून भाजपा पक्ष व आमच्या उमेदवारांना बदनाम करू पाहत आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक या सर्वांनी गेल्या पाच वर्षांत एकही विकास काम केले नाही,अशी टीकाही राणे यांनी विरोधकांवर केली.




मायनिंग साठी वैभव नाईक मंत्रालयात-


आमदार नाईक हे मूळ काँग्रेसवासीय व ठेकेदार आहेत. फावडे कुठे मारायचे ते त्यांना चांगले माहीत आहे. आता कुडाळ, मालवणसाठी नाही तर ते सावंतवाडीमध्ये २२ कोटींचा जो मायनिंगचा साठा आहे तो आपल्याला किंवा त्यांच्या संबंधितांना मिळावा या करिता हे मंत्रालयाचे उंबरठे झिजवत असल्याचाही टोला निलेश राणे यांनी लगावला.
Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली