मराठवाड्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

  61

हिंगोली : राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढले होते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी सर्व स्तरातून मागणी केली जात होती. प्रत्येक महसूल मंडळात गावागावात जाऊन शेतातील दहा बाय दहा मधील सोयाबीन कापणी करून त्याचे आनेवारी काढण्यासाठी डेटा वर पाठवला होता. शिवाय विविध जिल्ह्यांची १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यात बहुतांशी जिल्ह्याची पैसेवारी ५० पैसेच्या आत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पिकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही पीक विमा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


हिंगोली जिल्ह्यांमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात पासूनच अतिवृष्टीने फटका बसायला सुरुवात झाली होती. सोयाबीनच्या फुलोरा अवस्थेपासून ते काढणीपर्यंत अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, सोबतच इतरही पिकांना याचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडले होते. अनेक ठिकाणी प्रशासनाने काढलेली पैसेवारी ५० पेक्षा अधिक असल्यामुळे पिकवीमा मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. पण सर्व ठिकाणी पैसेवारी ५० पैशाच्या आत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


हिंगोली जिल्ह्यातील खरीप अंतिम पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील ७०७ गावांची पैसेवारी ४५.९९ पैसे आली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ३.९४ लाख हेक्कटर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यामध्ये सर्वात जास्त २.५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचां पेरा होता. त्यापाठोपाठ पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड तसेच उर्वरित क्षेत्रावर तूर, उडीद,मूग, ज्वारी पिकांची पेरणी झाली होती. मात्र यामध्ये पिकं हाती येण्याच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या