शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे : चंद्रकांत पाटील

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) हिंदुंची व्होटबँक (Hindu Votebank) तयार केली आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यावर कळस चढवला, या वक्तव्यामुळे वादात सापडलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आता नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी आपल्या या विधानाचे समर्थन करताना आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली.


मी शिवरायांबद्दल बोललो त्यामध्ये काहीच चुकीचे नाही. त्यांनी व्होटबँक तयार केली म्हणजे ईव्हीएम मशीन घेऊन केली असा होत नाही. तर त्यांनी हिंदू जनमत संघटित केले. मावळ्यांना देश, देव आणि धर्मासाठी जगायला शिकवले. हिंदूंना संरक्षण दिले. शिवाजी महाराजांनी त्यावेळी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नव्हे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भूमिकेचे ठामपणे समर्थन केले आहे. गेल्यावेळी मी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मला धमक्या आल्या. काही जणांनी आम्ही तुमच्याविरोधात निदर्शनं करु, असा इशारा दिला. मी एवढेच सांगतो की, आम्ही कोणाला डिवचणार नाही, पण कोणी आम्हाला डिवचलं तर सोडणारही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.


आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या हिंदुत्वावादी भूमिकेचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींनी हिंदूधर्मीयांची खरी गरज ओळखली. अयोध्या मुक्त केली पाहिजे, बाबरी पाडली गेली पाहिजे. कारण बाबर हा आमचा वंशज नव्हता, तो आक्रमक होता. राम आमचा वंशज होता. त्यामुळे मोदींनी अयोध्येत त्याचं मंदिर बांधायचा संकल्प केला. कारण मोदींनी माहितीये की, या देशातील सामान्य माणसाची गरज ही फक्त पोटाला अन्न इतकीच मर्यादित नाही. त्याला या स्थितीतही हरिद्वार, केदारनाथ आणि काशीविश्वेवराचं दर्शन घ्यायचे आहे. या देशात कित्येक वर्षे स्वत:च्या धर्माला वाईट म्हणा आणि दुसऱ्याच्या धर्माला बरं म्हणा, अशाप्रकारची धर्मनिरपेक्षता होती, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात