आलिया भटवरील कारवाईबाबत निर्णय घ्या

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या दोघी ज्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या त्या पार्टीमध्ये अभिनेत्री आलिया भट देखील सहभागी होती. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने तीला होम क्वारंटाईन केले असताना नियम तोडून तिने दिल्ली प्रवास केला आहे. या प्रकरणी आलियावर कारवाई करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकरणी काहीतरी निर्णय पालिकेने घ्यावा, अशी मागणी आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी प्रशासनाला केली आहे.



बॉलिवूडच्या एका पार्टीत या अभिनेत्री सहभाही झाल्या होत्या. या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याच पार्टीत सहभागी असलेली आलिया भट एका हाय रिस्क कोविड १९ संसर्ग बाधीत रुग्णाच्या संपर्कात आली असल्यामुळे तिला होम क्वारंटाईन राहण्याचे बंधन पालिकेने घातले होते. मात्र असे असतानाही आलिया भट्टने पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करत शुटींगसाठी दिल्ली प्रवास केला. मात्र असे असूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे तिच्यावर कारवाईबाबत काहितरी निर्णय घ्या अशी मागणी आरोग्य समिती अध्यक्षांनी केली आहे.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील