ऑनलाइन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई

  65

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात यायला लागल्यानंतर मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता आणली गेली. यामुळे १ ते ७ वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. अशा शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या जातील व नंतर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.



दरम्यान मुंबईतील महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायचे की नाही? हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असणार आहे. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संमती दिलेले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे अशा शिक्षण विभागाच्या सूचना असतानाही अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान अशा शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून आधी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या जातील. जर ऑनलाईन शिक्षण सुरू केले नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.



मुंबईत ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यापासून अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास संमती दिली नसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र काही शाळा ऑनलाईन शिक्षण देत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिका अशा शाळांवर कारवाई करणार आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड