नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांचे नवीन आधुनिक तेजस गाड्यांमध्ये रूपांतर करून अधिक आरामदायी सोयीसुविधांसह रेल्वे प्रवासाचे नवे युग सुरू केले आहे. रेल्वेने तेजसच्या धर्तीवर 4 राजधानी गाड्यांमध्ये आधुनिक बदल केले आहेत.
भारतीय रेल्वे तेजस स्लीपर कोचेससह 4 राजधानी गाड्या चालवत आहे. रेल्वेच्या एलएचबी प्लॅटफॉर्मवर स्लीपर कोचसह अत्याधुनिक तेजस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक गाड्यांमध्ये स्वयंचलित प्रवेश दरवाजे आणि प्रवासी माहिती प्रणाली आहे.
तसेच आग आणि धूर शोध आणि शमन प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.सुधारित शौचालय- जैव-शौचालयांसह व्हॅक्यूम असिस्टेड फ्लशिंग, उच्च दर्जाची टॉयलेट फिटिंग, टच फ्री सोप डिस्पेंसर, बसण्यासाठी विशेष कक्ष देण्यात आले आहेत. त्यासोबतचएलईडी दिवे, सुरेख रंगसंगती इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. तेजस डब्यांसह सुधारित पहिली राजधानी गाडी दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेने जुलै 2021 मध्ये चालवली होती.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…