निवडणुकीच्या तोंडावर मनसेत फेरबदल!

Share

औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा आणि शहर कार्यकारिणीत फेरबदल केले आहेत. दिलीप बनकर, सुमीत खांबेकर आणि वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती केली आहे. या फेरबदलाने मनसेतील धुसफुस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सप्तपदी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पक्षसंघटन मजबूत करा, असा संदेश बैठकीत देण्यात आला. या वेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते अभिजीत पानसे आणि दिलीप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी सतनामसिंग गुलाटी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येकी तीन मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे.

औरंगाबाद पूर्व-पश्चिम-मध्य मतदारसंघासाठी सुमीत खांबेकर, गंगापूर-वैजापूर-पैठण मतदारसंघासाठी दिलीप बनकर आणि फुलंब्री-सिल्लोड-कन्नड मतदारसंघासाठी वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्व शहराध्यक्षपदी आशिष सुरडकर आणि पश्चिम शहराध्यक्षपदी गजन गौडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ‘मध्य’चे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. पक्षाचा आढावा घेऊन कार्यकारिणीत फेरपालट केले आहेत. आणखी काही निर्णय घेतले जातील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरुन तडकाफडकी हटविण्यात आले. पदभार घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत वर्णी लागली नाही. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या बदलावर काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

1 hour ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

3 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

3 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

6 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

6 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

6 hours ago