गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्सहून भारतात आणले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्समध्ये अटक करून भारतात आणण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे.


पुजारी हा १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार होता आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपीन्समध्ये त्याला अटक केली गेली होती. त्याच्याविरोधात ठाण्यात जबरदस्ती वसुलीचे २३ गुन्हे दाखल आहेत. सुरेश हा गँगस्टर रवी पुजारीचा जवळचा नातलग आहे आणि २००७ मध्ये त्याच्यापासून तो वेगळा झाला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेलेला होता. सुरूवातीच्या काळात त्याने रवी पुजारी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत काम केलं आणि नंतर त्याने स्वत:ची गँग तयार केली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.



सुरेश पुजारीला ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मुंबई आणि कर्नाटकात वसुलीच्या अनेक प्रकरणांमध्ये तो पोलिसांना हवा होता. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुजारीला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मुंबई गुन्हे शाखेची एक टीम पुजारीला ताब्यात घेण्यासाठी अगोदरच दिल्लीत पोहोचलेली आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जबरदस्ती वसुलीच्या अनेक प्रकरणांनंतर २०१७ आणि २०१८मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील काढली होती.

Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन