Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बिहारच्या राजकारणाचे केंद्रस्थान राहिलेले नीतीश कुमार आता राज्याच्या राजकारणातून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण राज्यसभेवर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात आता सत्तेचे नवे समीकरण आकारास येत आहे.



भाजपचा पहिला मुख्यमंत्री



हिंदी भाषिक राज्यांमध्ये बिहार हे एकमेव असे राज्य होते जिथे अद्याप भाजपचा मुख्यमंत्री झाला नव्हता. नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. एनडीएच्या सूत्रानुसार, आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाईल, तर जेडीयूच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येणार आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नीतीश कुमार यांनी सन्मानाने पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.



निशांत कुमार यांची राजकारणात एन्ट्री



नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे आता बिहारचे नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात प्रवेश करतील. त्यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे समजते. जेडीयू कोठ्यातून दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विजय चौधरी आणि अशोक चौधरी (दलित चेहरा) यांची नावेही चर्चेत आहेत.



जेडीयूमध्ये नाराजी?



नीतीश कुमार यांच्या या निर्णयामुळे जेडीयूच्या गोटात काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. आमदार दलाची बैठक न घेता इतका मोठा निर्णय घेतल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. अशा महत्त्वाच्या निर्णयावर विधिमंडळ पक्षात चर्चा होणे गरजेचे होते, असे काही आमदारांचे मत आहे. लवकरच या संदर्भात आमदार दलाची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.



राज्यसभा निवडणुकीचे गणित



बिहारमधून राज्यसभेच्या ५ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून गुरुवारी (आज) नामांकनाचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता नीतीश कुमार यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

Comments
Add Comment

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Amazon Great Freedom Sale 2026 : स्वातंत्र्यदिनानिमित्त Amazon ची मोठी ऑफर! ७ ऑगस्टपासून फ्रीडम सेल सुरू; पाहा काय असणार खास ?

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अ‍ॅमेझॉन'ने (Amazon) आपल्या भारतीय

Dubai-Mumbai IndiGo Flight : दुबई-मुंबई विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग; कार्गो होल्डमध्ये धूर दिसल्याने धावपळ

नवी दिल्ली : दुबईवरून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी

Dharmendra Pradhan : "मी एसीतला नाही, तर रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता!" काँग्रेसच्या टोमण्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार; राजीनाम्यानंतर संसदेत जंगी स्वागत

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाच्या वादात शिक्षणमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा

Bihar Student Protest : बिहार बंद आंदोलनादरम्यान गोळीबार, AK-47 वापरल्याप्रकरणी पोलीस निलंबित, व्हिडिओ व्हायरल

बिहारमध्ये पेपरफुटी प्रकरणासह (Bihar) विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या 'बिहार बंद' (Bihar Band)

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला