नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) १२ आमदारांच्या (MLA) निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सध्या तरी कोणताही आदेश दिलेला नाही. याबाबत पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. जुलै महिन्यात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर आता राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे.
अधिवेशन सुरु असताना विधानसभा सभागृहात या आमदारांनी गोंधळ घातला होता. याशिवाय तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं. यानंतर भाजपच्या तब्बल १२ सदस्यांवर विधानसभेत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. एक वर्षासाठी ही निलंबनाची कारवाई होती. निलंबित झालेल्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंटी) बागडिया यांचा समावेश आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…