कोहलीची वनडे मालिकेतून माघार

नवी दिल्ली/मुंबई (वृत्तसंस्था): माजी कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. उभय संघांमधील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतही तो खेळण्याबाबत साशंकता आहे. मुलगी झीवा हिच्या पहिल्या वाढदिवसासाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ‘ब्रेक’ मिळावा, असे त्याने बीसीसीसीआयला कळवले आहे.

भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका १९ ते २३ जानेवारी २०२१ या कालावधीत खेळली जाणार आहे. विराटची मुलगी झीवा हिचा वाढदिवस ११ जानेवारीला आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकप झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत आणि पहिल्या कसोटीसाठी विराटने विश्रांती घेतली होती. भारताच्या आफ्रिकन दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सेंच्युरियन कसोटी मालिकेने होणार आहे. उर्वरित दोन कसोटी सामने ३ ते ७ आणि ११ ते १५ या कालावधीत पार्ल येथे होतील.


दोन्ही कर्णधार एकत्र खेळण्याची शक्यता कमी


आगामी द. आफ्रिका दौऱ्यात विराट कोहली तसेच रोहित शर्मा हे अनुक्रमे कसोटी तसेच झटपट प्रकारांतील कर्णधार एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे. वनडे आणि टी-ट्वेन्टी कर्णधार रोहित हा स्नायू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून ‘आउट’ झाला आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान तीन आठवडे लागतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे. गंभीर दुखापत पाहता वनडे मालिकेसाठी तो उपलब्ध असण्याबाबत साशंकता आहे.

तिसऱ्या कसोटीत विराट न खेळल्यास नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे. उपकर्णधार रोहित या मालिकेत खेळणार नाही. रोहितच्या जागी नव्या व्हाइस कॅप्टनची निवड झालेली नाही. कसोटी उपकर्णधारपदासाठी माजी उपकर्णधार आणि अनुभवी अजिंक्य रहाणेचे नाव आघाडीवर आहे. काहीच दिवसांपूर्वी विराटकडून वनडे प्रकाराचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि रोहितकडे ही जबाबदारी सोपण्यास आली होती. त्यापूर्वी, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर रोहितला या प्रकाराचा पूर्णवेळ कर्णधार नेमण्यात आले.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने