याला सगळेच जबाबदार - राज ठाकरे

औरंगाबाद : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) पत्रकार परिषदेत बोलताना देशासह राज्यातील विविध मुद्य्यांवर परखड मत व्यक्त केले. तसेच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना त्यांनी राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, असा प्रश्न विचारत राज्यात आणि देशात निर्माण झालेल्या अनिश्चिततेला प्रसारमाध्यमांसह सगळेच जबाबदार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.


राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील आणि देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहेत, असे म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन वाझे, मुकेश अंबानींच्या घराखाली आढळलेली बाँब ठेवलेल्या गाडीबद्दलही त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.


“भाजपा नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, असे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आताचे एकूण हे तिघांचे सरकार पाहता, काही आता सरकार पडेल असे मला वाटत नाही. तसेच, मला वैयक्तिक कुठले कोणाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. घोटाळ्यांपेक्षा कोणाच्या घरात मला डोकवायचं नाही. या सगळ्यामध्ये एकटे किरीट सोमय्या… ते पूर्वीपासून हेच करत आहेत, त्या सगळ्या गोष्टींची देखील उत्तरं सापडत नाहीत.


महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते, त्यासाठी म्हणून आपण शॅडो मंत्रिमंडळ निर्माण केले. मात्र त्याचवेळी नेमका लॉकडाउन लागला. या कोरोनाच्या काळात आमच्या अनेक लोकांनी प्रचंड काम केले. परंतु ते प्रचंड का हे सोशल मीडियावरतीच राहीले. ज्यांच्यापर्यंत आमचे लोक पोहचले त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. रोजच्या रोज आपण प्रत्येक गोष्टीला शिव्या घालायच्या, या औरंगाबाद महापालिकेत एवढे प्रश्न आहेत, पाणी, रस्त्यांसह अनेक प्रश्न असतील, पण निवडणुकीच्या वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विसर पडत असेल, तर मला असे वाटते की मग तुम्ही हेच भोगा, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.


व्यावसायिक देश सोडून गेले त्याबद्दल बोलताना म्हणाले, “मी कालच म्हणालो, यामध्ये नोटाबंदीपासून ते या सगळ्या लॉकडाउनपर्यंत सर्वच गोष्टी आल्या आहेत,” असेही यावेळी राज ठाकरे यांनी बोलून दाखवले.


विशेष म्हणजे त्यांनी माध्यमांच्या कार्यशैलीवर देखील बोट ठेवले. मुळ विषय बाजूला ठेवून, इतर विषय दाखवले जातात. यात राजकारण्यांकडून प्रसार माध्यमांचाही वापर केला जातो. त्यातून आर्यन खान प्रकरण, वाझे सारखे प्रकरण दाखवले जातात. मात्र, पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडल्याचा कोणीही शोध घेत नाहीत. त्यामुळे किती रोजगारांवर परिणाम होतो हे कुणी बघत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे

Maharashtra Weather Update : पुढील ७२ तासांत राज्यावर कोणते मोठे संकट? प्रशासनाचा स्पष्ट इशारा; 'अति महत्वाचं काम' म्हणजे नेमकं काय?

काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान

Devendra Fadanvis : ब्रेकिंग पुणे! केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्र्यांच्या मंचावर सापाचा शिरकाव; सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

पुणे : पिंपरी-चिंचवडजवळच्या किवळे (Kiwale) येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज दुहेरी

गुन्हेगारी स्टाईलने 'रिल्स' बनवणा-याला दिला पोलिसांनी दणका

पुणे : दिवाळीच्या उत्सवात सोशल मीडियावर विविध प्रकारच्या जाहिराती येत असतात. अनेकजण आपल्या व्यवसायाच्या

ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार