भाजपचा महाविकासआघाडीला दणका; विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप विजयी

  86

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election) आज (14 डिसेंबर) जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने विधान परिषदेच्या सहापैकी चार जागांवर विजय मिळवून महाविकासआघाडीला दणका दिला आहे.


सहापैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. विधान परिषदेच्या एकूण ६ जागांवर निवडणुका आयोगाने जाहीर केल्या होत्या. त्यातील मुंबईतल्या दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या. त्यामुळे त्यांचा निकाल अगोदरच लागला आहे.


मात्र, निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर (Nagpur) आणि अकोला-वाशिम-बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) विजयी ठरले. यामुळे या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या