रोहित शर्मा स्नायूदुखीमुळे दक्षिण आफ्रीकेच्या दौ-याबाहेर


मुंबई (प्रतिनिधी): आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच्या सरावादरम्यान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. सरावादरम्यान, थ्रो डाउन स्पेशलिस्ट राघवेंद्र यांनी टाकलेला चेंडू रोहितच्या थेट पायावर आदळला. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याचे अपडेट अद्याप बीसीसीआयने दिले नाहीत.






सोमवारच्या सरावात सुरुवातीला माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ४५ मिनिटे फलंदाजीचा सराव केला. रहाणेनंतर रोहित सरावासाठी आला. सराव करताना चेंडू त्याच्या पायाला लागला. चेंडू लागल्यावर तो कळवळला. त्यानंतर रोहित बराच वेळ शांत आणि नर्व्हस दिसत होता. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे रोहितकडे अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी आहे. पण त्याची ही दुखापत पाहता रोहित शर्मा आता दक्षिण आफ्रीकेच्या दौराला मुकणार आहे असं दिसतं.






दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचे क्रिकेटपटू १६ डिसेंबर रोजी मुंबईतून रवाना होणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेले क्रिकेटपटू सध्या मुंबईत क्वारंटाइनमध्ये आहेत. कसोटी संघातील खेळाडूंचा सराव सुरू आहे.


Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण