स्वामी समर्थांचे खंडोबा मंदिर

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा काळ असेल. निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप स्वामी समर्थांच्या रूपाने अक्कलकोटात प्रथम अवतरले. त्या खंडोबा मंदिराची कथा अशी सांगितली जाते - अक्कलक्कोट संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्या नेहमी पंढरपूर, तुळजापूर व जेजुरी आदी तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करीत असत. त्यातल्या त्यात त्यांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती. एकदा त्यांच्या मनात आले की, श्री खंडेरायाचे दर्शन आपणाला सदैव व सहज व्हावे, म्हणून अक्कलकोट येथेच एक श्री खंडेरायाचे मंदिर बांधावे. त्याप्रमाणे एकदा जेजुरीवरून येताना त्यांनी श्री खंडेराया, श्री म्हाळसा व श्री बाणाबाई अशा तीन मूर्ती बरोबर आणल्या. अक्कलकोट येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी जेजुरीहून येताना खंडेरायाच्या मूर्तीबरोबर एक छोटा घोडाही आणला होता. मार्गशीर्ष महिन्यातील रविवार व चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाई. पुढे काही वर्षांनंतर तो घोडा मरण पावल्यानंतर त्यांचा अंत्यविधी या खंडोबा मंदिरासमोर करण्यात येऊन तेथेच त्याची समाधीही बांधण्यात आली. ती आजही चांगल्या स्थितीत आहे. मध्यंतरी कैलासवासी श्रीमंत ताराबाई राणीसाहेब यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या चारही बाजूस पत्रे व कट्टा बांधून मंदिर बरेच वाढविण्यात आले. सध्या मंदिर चांगल्या स्थितीत असून थोडीफार सुधारणाही झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्यांना अक्कलकोट क्षेत्राची नीट माहिती आहे, ते इथे जातातच. निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप अक्कलकोटात प्रथम अवतरले ते इथेच.


त्यामुळे या स्थानाचे माहात्म्य आगळे आहे.


स्वामी म्हणे राहा सदा उत्साही
प्रसन्न आई, ताई, बारामाही ।। १।।
राहा सदा नि सदा साहसी
आनंदी राहाल बारामासी ।। २।।
राहा सदा ठेवून श्रद्धा धीर
माराल शत्रूवर बिनचूक तीर ।। ३।।
वापरा सदा अभ्यासून बुद्धी
नाहीशी होईल शत्रूची कुबुद्धी ।। ४।।
व्यायाम करूनी वाढवा शक्ती
वाढेल मस्तिष्काची शक्ती ।। ५।।
नेहमीच गाजवा तुमचा पराक्रम
करा आयुष्यभर नवीन विक्रम ।।६।।
ही बाळगता सहा शस्त्रे
शत्रू होईल शरण निःशस्त्रे ।। ७।।
स्वामी करेल तुम्हाला समर्थ
भिऊ नको पाठीशी,
स्वामी समर्थ ।। ८।।


विलास खानोलकर
vilaskhanolkardo@gmail.com

Comments
Add Comment

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला

Surya Grahan 2026: दुर्मीळ योग! माघ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; काय खावे आणि काय टाळावे?, जाणून घ्या...

मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण

Solar Eclipse: १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवसभरात कोणत्या चूका टाळाव्यात?

मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या

MahaShivratri 2026: महाशिवरात्री पूजेनंतर वापरलेल्या साहित्याचे काय करावे?, विसर्जनाची योग्य पद्धत जाणून घ्या...

मुंबई: महाशिवरात्री पूजा संपताच मनात विचार येतो की, पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे काय करावे? ते कचऱ्यात

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची