आयपीएल आयोजनातील वाईट काळ संपला : सौरव गांगुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएल आयोजनातील वाईट काळ संपला आहे. भविष्यात ही लीग भारतात खेळण्यात कुठलीही बाधा येणार नाही, असा विश्वास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.



कोरोनाशी निगडीत अनेक समस्या असतानाही युएईत आयपीएल स्पर्धा पूर्ण करू शकलो. आयपीएल ही बीसीसीआयची स्पर्धा आहे आणि ती भारतात खेळली जाते, तेव्हा ते वेगळे वातावरण असते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे. आम्ही न्यूझीलंडचे यजमानपद भूषवले. आपला संघ आता दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ आपल्याकडे येईल. आमचे देशांतर्गत क्रिकेट पूर्वीप्रमाणेच पूर्ण प्रवाहात आहे. गेल्या वर्षी ब्रेक होता. आम्ही जवळजवळ प्रत्येक स्पर्धा पूर्ण केली आहे. रणजी करंडक जानेवारीपासून सुरू होत आहे. ज्युनियर स्तरावरील क्रिकेट सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफी सध्या भारतात सुरू आहे, असे गांगुली म्हणाले.



कोरोनामुळे आयपीएल २०२१ आणि टी-ट्वेन्टी वर्ल्डकप २०२१ चा उर्वरित हंगाम भारताऐवजी परदेशात आयोजित करता आला नाही. त्यासाठी युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीला प्राधान्य देण्यात आले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आता पुढील हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार असल्याने सर्व प्रमुख क्रिकेटपटूंची अदलाबदल होणार आहे.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ