काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?.पवारांनी सांगितला आठवणीतला किस्सा



मुंबई : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या १२ डिसेंबरला ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. राज्यभरात पवार यांच्या वाढदिवसाचे सोहळे सुरू झालेले आहेत. या निमित्त मुंबईत आज लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवार यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. यावेळी पवार यांची कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एक किल्ला सांगितला. तो सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा आहे.



राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते. फक्त तुम्ही समोरच्या माणसाचे नाव लक्षात ठेवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातलीच होती. तिचे काहीतरी काम होते. मी तिला म्हटले, की काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?. यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली. काम होवो न होवो, अशी तिची भावना होती, असा किस्साच शरद पवार यांनी उपस्थितांना ऐकवला.


 


 

Comments
Add Comment

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला

Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या