Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२० विश्वचषक २०२६ चा २७ वा लीग सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना ६१ धावांनी जिंकला. भारताच्या विजयानंतर, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक महत्त्वपूर्ण विधान केले, ज्यात त्याने म्हटले की भारत विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता. अख्तरने त्याच्या स्वतःच्या देशाबद्दल म्हणजेच पाकिस्तानबद्दलही एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.



'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता'


एका वृत्तवाहिनीवर बोलताना अख्तर म्हणाला, "तुम्ही भारतीय असाल किंवा पाकिस्तानी, तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. जर कोणताही संघ ते थांबवू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल."



'सामन्यात पाकिस्तान कुठेही नव्हता'


अख्तर पुढे म्हणाला, "पाहा, पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्यात पाकिस्तान कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीच्या २३ धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे. तो १२५ (किमी प्रतितास) वेगाने गोलंदाजी करत आहे."



'आधुनिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान खूप मागे'


अख्तर यांनी यावर भर दिला की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाही. ते पुढे म्हणाले, "पाकिस्तान जे खेळत आहे, ते आधुनिक क्रिकेट नाही. भारत पुढील १०० वर्षे किंवा ५० वर्षे क्रिकेट खेळत आहे. पाकिस्तान खूप खराब क्रिकेट खेळत आहे आणि या फॉरमॅटमध्ये (टी२० आंतरराष्ट्रीय) खूप मागे आहे."

Comments
Add Comment

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी