सासरच्यांना खूश करण्यासाठी करायचा चोऱ्या

मोनिश गायकवाड



भिवंडी : होऊ घातलेल्या सासरच्या मंडळींना खूश करण्यासाठी एका आरोपीने चक्क घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी या अट्टल चोरट्याने आपल्या भावी सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी घरफोड्या केल्या असून त्या आरोपीस अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले अाहे. त्याच्याकडून तब्बल ५ कार,५ मोटर बाईक, एक मंगळसूत्र असा ६ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात वाहन चोरीच्या घटनां मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने त्या बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी गस्त घालण्याच्या सक्त सूचना पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी गस्त व नाकाबंदी केली जात असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना एक वाहन चोरी करणाऱ्याची माहिती गुप्त बातमीदारा कडून मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत,पो. नि. किरण काबाडी ,विक्रम मोहिते व निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र पाटील व पथकातील भोला शेळके ,किरण जाधव ,प्रसाद काकड,अमोल इंगळे,रवींद्र पाटील, श्रीकांत पाटील यांनी सापळा रचून भिवंडी शहरातील टेमघर परिसरात राहणारा शिवासिंग अमिरसिंग बावरी (२०) यास अटक केली आणि त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या ताब्यातून ५ कार, ५ दुचाकी व दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल जप्त करीत नारपोली, कल्याण ,डोंबिवली, कळवा, शिवाजी नगर अशा विविध पोलीस ठाण्यातील तब्बल अकरा गुन्ह्यांची उकल केली आहे .



शिवासिंग अमिरसिंग बावरी हा अल्पवयीन असल्या पासून सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असून आरोपीचे पुढील महिन्यात लग्न असल्याने लग्नासाठी पैसे जमविणे आणि सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी त्याने घरफोडीचे गुन्हे केले. कार चोरी करून तिचा उपयोग तो घरफोडी करण्यासाठी करीत होता अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई