पुणे (प्रतिनिधी) : सत्ताधारीच जर राज्यातील महिलांना सुरक्षा पुरवत नसतील, तर त्या सत्तेला काय अर्थ आहे? आज महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
राज्यात महिला व लहान मुलींवर मोठ्या प्रमाणावर होणारे अत्याचार, या विषयावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
चित्रा वाघ म्हणाल्या, या दोन वर्षांत महाराष्ट्राने काय नाही पाहिले. चांद्यापासून बांद्यापर्यंत एक जिल्हा असा नाही, ज्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाहीत. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी मागील दोन वर्षांत उच्चांक गाठला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहान मुली, शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत आणि पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत आहे.
पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटले जाते. पण आता ते अत्याचाराचे माहेरघर झाले आहे का? पुणेतील अत्याचार घडत आहेत ते देखील उणे नाहीत. याचबरोबर, आतापर्यंत अनेक सरकारे आली, अनेक गेली; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी वाईट अवस्था आम्ही आजपर्यंत पाहिलेली नव्हती, असेही चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितले.
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…