किल्ले रायगडावरील गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार

संजय भुवड


महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनाचे काम रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. येणाऱ्या चार ते पाच वर्षांत किल्ले रायगडाचे चित्र पूर्णपणे पालटणार असून गडाला पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे. त्यामुळे ३५० वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर असणारे वैभव ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक, शिवभक्त येणार असल्याने त्यांना रायगडावरील वैभवाची माहिती देण्यासाठी सर्व भाषांची जाण असणाऱ्या गाईड्सची आवश्यकता भासणार आहे.


आजमितीला येथील स्थानिक तरुण या व्यवसायावर आपली उपजिवीका चालवत आहेत, मात्र परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत रायगड समजावून सांगण्यासाठी स्थानिक तरुणांना सर्व भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील तरुणांनी उच्चशिक्षण घेऊन या व्यवसायात आपले करिअर करावे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.


किल्ले रायगडावर पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या कुटुंबातील तरुण व रायगडाच्या आसपासचे गावांतील तरुण गाईडचा व्यवसाय करताना दिसत आहेत. मात्र केवळ ७वी ते ८वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते या व्यवसायामधून मिळणाऱ्या रोजगारावर समाधान मानत आहेत. केवळ मराठी आणि मोडक्या-तोडक्या हिंदीत हे स्थानिक गाईड पर्यटकांना माहिती देत असतात. मात्र परदेशातून किल्ले रायगड जाणून घेण्यासाठी येणारे पर्यटक मुंबई-पुण्याहून सोबत गाईड घेऊन येत असतात.


स्थानिक गाइड्सची संख्या अधिक होणार


आजमितीला किल्ले रायगडावर दर आठवड्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या ५० ते ६० हजारांवर असून संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या संख्येत फार मोठी वाढ होणार आहे. नव्याने साकारल्या जाणाऱ्या रायगडाचे रूप व त्यावरील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना रायगडाची माहिती सांगण्यासाठी गाईड्सचीही मोठ्या संख्येने गरज लागणार आहे. पुढील चार-पाच वर्षांत गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार असून स्थानिक तरुणांनी उच्च शिक्षणासोबत सर्व भाषा आत्मसात करून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत रायगडची माहिती सांगितल्यास त्याचा फायदा होऊन त्यांच्या उत्कर्षाला हातभार लागेल.

Comments
Add Comment

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.