किल्ले रायगडावरील गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार

  107

संजय भुवड


महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनाचे काम रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. येणाऱ्या चार ते पाच वर्षांत किल्ले रायगडाचे चित्र पूर्णपणे पालटणार असून गडाला पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे. त्यामुळे ३५० वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर असणारे वैभव ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक, शिवभक्त येणार असल्याने त्यांना रायगडावरील वैभवाची माहिती देण्यासाठी सर्व भाषांची जाण असणाऱ्या गाईड्सची आवश्यकता भासणार आहे.


आजमितीला येथील स्थानिक तरुण या व्यवसायावर आपली उपजिवीका चालवत आहेत, मात्र परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत रायगड समजावून सांगण्यासाठी स्थानिक तरुणांना सर्व भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील तरुणांनी उच्चशिक्षण घेऊन या व्यवसायात आपले करिअर करावे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.


किल्ले रायगडावर पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या कुटुंबातील तरुण व रायगडाच्या आसपासचे गावांतील तरुण गाईडचा व्यवसाय करताना दिसत आहेत. मात्र केवळ ७वी ते ८वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते या व्यवसायामधून मिळणाऱ्या रोजगारावर समाधान मानत आहेत. केवळ मराठी आणि मोडक्या-तोडक्या हिंदीत हे स्थानिक गाईड पर्यटकांना माहिती देत असतात. मात्र परदेशातून किल्ले रायगड जाणून घेण्यासाठी येणारे पर्यटक मुंबई-पुण्याहून सोबत गाईड घेऊन येत असतात.


स्थानिक गाइड्सची संख्या अधिक होणार


आजमितीला किल्ले रायगडावर दर आठवड्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या ५० ते ६० हजारांवर असून संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या संख्येत फार मोठी वाढ होणार आहे. नव्याने साकारल्या जाणाऱ्या रायगडाचे रूप व त्यावरील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना रायगडाची माहिती सांगण्यासाठी गाईड्सचीही मोठ्या संख्येने गरज लागणार आहे. पुढील चार-पाच वर्षांत गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार असून स्थानिक तरुणांनी उच्च शिक्षणासोबत सर्व भाषा आत्मसात करून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत रायगडची माहिती सांगितल्यास त्याचा फायदा होऊन त्यांच्या उत्कर्षाला हातभार लागेल.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण