एसटी संपाला हिंसेचे गालबोट


एकूण २०५३ कर्मचारी निलंबित




मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे. यातच कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण मिळाल्याचे दिसत आहे. नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातील २ शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली आहे. एका बसची मागील काच फोडण्यात आली, तर दुसऱ्या बसचे लाईट फोडण्यात आले. दोन दुचाकींवरून आलेल्या काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दगडफेक केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व चौकशी सुरू केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनावर तोडगा काढायचा सोडून प्रशासनाने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळेदेखील सध्या राज्यात वातावरण तापलेले आहे. त्यातच सांगलीत एका एसटी कर्मचाऱ्याच्या निधनाच्या वार्तेमुळे आणखी वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.


दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी लढा सुरू असलेले एसटी कामगार गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आजाद मैदान परिसरात ठाण मांडून बसले आहेत. मात्र एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आजाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही असा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आजाद मैदान परिसरात हजेरी लावत आहेत व एसटी कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबतच रात्र काढली. गुरुवारी माजी मंत्री अनिल बोंडे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आ. संजय केळकर यांनी आजाद मैदान परिसरात येऊन संपाला पाठिंबा दिला.


तसेच राज्यातील विविध आगारांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, तर जिल्हास्तरावर संबंधित कामगार न्यायालयात संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात दावे दाखल करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.


सांगलीत कर्मचाऱ्याचे निधन


सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे गुरुवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसांपूर्वी सांगली बस स्थानकासमोर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आज सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. राजेंद्र निवृत्ती पाटील (४६) असे त्यांचे नाव आहे. संप लांबत चालल्याने कर्मचारी तणावाखाली असल्याने आशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने संपावर त्वरित तोडगा काढावा आणि मृत वाहकाच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक