विरार स्मशानभूमीतील चिमणी बंद असल्याने संपूर्ण परिसरात धूर

Share

नालासोपारा (वार्ताहर) : विरार पश्चिमेतील स्मशानभूमीमध्ये सुविधांची कमतरता असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. स्मशानातली चिमणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने मृतदेह जाळल्यानंतर धूर वर न जाता संपूर्ण परिसरात पसरत आहे. यामुळे नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे.

पावसाळ्यात आलेल्या वादळ वाऱ्यामुळे विरार पश्चिमेला असलेल्या स्मशानभूमीचा पत्रा निघाला होता. त्यानंतर या स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची सतत मागणी करण्यात येत होती. मात्र, वारंवार नागरिकांकडून मागणी करूनही या स्मशानभूमीची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. पत्र्याप्रमाणेच या स्मशानभूमीची चिमणीसुद्धा खराब झाली असून गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.

प्रत्येक स्मशानभूमीमध्ये एक चिमणी बसवलेली असते, जेणेकरून मृतदेह जाळल्यानंतर धूर सर्वत्र न पसरता वरच्या दिशेला जावा. मात्र, या स्मशानभूमीची चिमणीच खराब झाल्याने मृतदेह जाळल्यानंतर धूर सर्वत्र पसरतो. अनेकदा या स्मशानभूमीची डागडुजी केलेली आहे. परंतु, कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेची असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणे व स्मशानभूमीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

सर्वांनाच होतोय धुराचा त्रास

या स्मशानभूमीच्या आजूबाजूला वस्ती, दुकाने, दवाखाने, खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. खाद्यपदार्थांवर हा धूर बसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच दवाखानाही याठिकाणी असल्याने रुग्णांनासुद्धा या धुराचा त्रास होऊ शकतो. स्मशानभूमीच्या समोरच मैदान असल्याने लहान मुले खेळत असतात. या धुरामुळे त्यांनाही दम्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. हा धूर मृतदेह जळल्याचा असल्याने या धुरासोबतच दुर्गंधीसुद्धा पसरत आहे. नागरिकांना धुरामुळे कोणता रोग होऊ नये याची भीती सतावत आहे.

धूर येत असल्याने खाद्यपदार्थ घ्यायलाही कोणीही येत नाही. लोकांना आजार होण्याची भीती असते. तसेच मी संपूर्ण दिवस दुकानात बसून असल्याने मलासुद्धा या धुराच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. – आशीष मोहिते, दुकानदार

काळा धूर संपूर्ण परिसरात पसरत असतो. कधी जास्त मृतदेह असले तर संपूर्ण दिवस धूर सुरू असतो. अशा धुरामुळे आम्हाला दमा होण्याची शक्यता आहे. – रमेश गोसावी, सामान्य नागरिक

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

28 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

58 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago