दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक


मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील पार्किंगमध्ये आग लागली. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ जवळ रेल्वे स्टेशनच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये आग लागली, या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. आग लागल्यामुळे खाक झालेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. किमान १५ दुचाकींना तर अवघ्या काही मिनिटांत आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.


आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. वाहन तळ परिसरात असलेल्या लोकांनी तातडीने अनेक वाहने सुरक्षित ठिकाणी नेली. वाहन तळावरील अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने अग्निशमन उपकरण वापरुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पोलीस आणि अग्निशमन दल आग लागण्याचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी करत आहे.


Comments
Add Comment

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं