Video : मुख्यमंत्रीपदासाठी निष्ठा विकली : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेची आठवण केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी करुन दिली. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी निष्ठा विकली, असा आरोप त्यांनी केला.


उद्धव ठाकरेंनी हे सरकार बनण्याआधी पवारांबद्दल जे उद्गार काढले हे सांगतो. ‘पवारांना विनंती आहे की धरणाच्या आत अजित पवारांना नेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक म्हणजे अर्धवट मेंदूचे लोक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके. सोनिया गांधींनी काढून टाकल्यानंतर तुम्ही पुन्हा लाचारीने त्यांच्याकडे गेलात. शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू. नशीब महाभारतात शरद पवार नव्हते नाहीतर तिथेही फोडाफोडी केली असती’ ही विधानं उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी केली होती. आता मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून निष्ठा विकली, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.


शिवसेना प्रमुखांनी गद्दारीने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन केले नव्हते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली होती. याची आठवण करुन देताना शिवसेना प्रमुखांनी नाही तर त्यांच्या पुत्राने भाजपच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री पद मिळाले. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज सगळीकडे धिंडवडे निघत आहेत, असा टोमणा राणेंनी मारला आहे.


Comments
Add Comment

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई

आज मुंबईत पंतप्रधान मोदींची 'समुद्री व्हिजन' परिषद!

'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये