कोरोना योद्ध्यांवर उपासमारीची वेळ

  53


पाच महिने पगार नाही : वैभववाडीत दोन डॉक्टरांचा राजीनामा




वैभववाडी (प्रतिनिधी) : कोवीड काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांच्या बाबतीत ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी भूमिका आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या दोन डॉक्टरांचा गेले पाच महिने पगार झाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अखेर या दोन्ही कोरोना योद्ध्यांनी राजीनामा दिला आहे.


ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे प्रमुख पद गेली अनेक महीने रिक्त आहे. वैद्यकीय अधिक्षक नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णता बोजवारा उडाला आहे.


११ महिन्यांच्या करारावर तीन डॉक्टर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सांभाळत आहेत, मात्र आरोग्य यंत्रणेने या तिन्ही डॉक्टरांना पाच महीने उपाशी ठेवले आहे. मे महीन्यापासून डॉ. भानुप्रताप मलिक व डॉ. शिवानी बुटी हे दोन डॉक्टर कार्यरत होते. कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली आहे. त्यांना मे महिन्याचा पगार देण्यात आला. त्यानंतर जूनपासून तब्बल पाच महिने पगारच दिला नाही.


या डॉक्टरांना पगार नसल्याने ते अडचणीत आले होते. घर चालवायचे कसे? घरच्यांकडून सारखे पैसे कसे मागायचे? अशा कात्रीत ते डॉक्टर सापडले होते. अखेर कंटाळून या दोन्ही डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. कोरोना काळात ज्यांना कोविड योद्धा म्हणून संबोधित केले जात होते. त्या कोविड योद्ध्यांवरच अशी नामुष्की ओढवणे, हे दुर्दैव आहे. डॉ. धर्मे यांच्यावर आरोग्य यंत्रणेचा ताण पडत असल्याने ते ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले