कोरोना योद्ध्यांवर उपासमारीची वेळ

  52


पाच महिने पगार नाही : वैभववाडीत दोन डॉक्टरांचा राजीनामा




वैभववाडी (प्रतिनिधी) : कोवीड काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांच्या बाबतीत ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी भूमिका आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या दोन डॉक्टरांचा गेले पाच महिने पगार झाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अखेर या दोन्ही कोरोना योद्ध्यांनी राजीनामा दिला आहे.


ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे प्रमुख पद गेली अनेक महीने रिक्त आहे. वैद्यकीय अधिक्षक नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णता बोजवारा उडाला आहे.


११ महिन्यांच्या करारावर तीन डॉक्टर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सांभाळत आहेत, मात्र आरोग्य यंत्रणेने या तिन्ही डॉक्टरांना पाच महीने उपाशी ठेवले आहे. मे महीन्यापासून डॉ. भानुप्रताप मलिक व डॉ. शिवानी बुटी हे दोन डॉक्टर कार्यरत होते. कोरोना काळातही त्यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली आहे. त्यांना मे महिन्याचा पगार देण्यात आला. त्यानंतर जूनपासून तब्बल पाच महिने पगारच दिला नाही.


या डॉक्टरांना पगार नसल्याने ते अडचणीत आले होते. घर चालवायचे कसे? घरच्यांकडून सारखे पैसे कसे मागायचे? अशा कात्रीत ते डॉक्टर सापडले होते. अखेर कंटाळून या दोन्ही डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. कोरोना काळात ज्यांना कोविड योद्धा म्हणून संबोधित केले जात होते. त्या कोविड योद्ध्यांवरच अशी नामुष्की ओढवणे, हे दुर्दैव आहे. डॉ. धर्मे यांच्यावर आरोग्य यंत्रणेचा ताण पडत असल्याने ते ही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण