मीरा रोडमध्ये भराव टाकून तलाव बुजवण्याचा प्रयत्न!

  25

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील मीरा गावठाण येथील नैसर्गिक तलावात मातीचा भराव टाकून तो बुजविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती बातमीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून दिल्यावर सुद्धा कोणतीही कारवाई न केल्यामुळे तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मागील बाजूस निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मीरा गावठाणमध्ये नैसर्गिक तलाव असून गेल्या काही दिवसांपासून या तलावाच्या एका बाजूला श्री हरिकृपा हॉस्पिटल असा फलक लावण्यात आला आणि त्याच बाजूने रोज रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत माती भराव केला जात होता. त्यामुळे तलावाची रुंदी कमी कमी होत गेली आहे. तलावाच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलाठी कार्यालयाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.


या संदर्भात प्रसिद्ध झालेली बातमी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला गेला. याला एक महिना होऊन गेला तरीसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


‘...माहिती घेतो’


या प्रकरणी अपर तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तलाठी यांच्याकडून माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर सुद्धा सातत्याने फोन करूनही तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांनी फोन उचलला नाही.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता