मीरा रोडमध्ये भराव टाकून तलाव बुजवण्याचा प्रयत्न!

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील मीरा गावठाण येथील नैसर्गिक तलावात मातीचा भराव टाकून तो बुजविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती बातमीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून दिल्यावर सुद्धा कोणतीही कारवाई न केल्यामुळे तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मागील बाजूस निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मीरा गावठाणमध्ये नैसर्गिक तलाव असून गेल्या काही दिवसांपासून या तलावाच्या एका बाजूला श्री हरिकृपा हॉस्पिटल असा फलक लावण्यात आला आणि त्याच बाजूने रोज रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत माती भराव केला जात होता. त्यामुळे तलावाची रुंदी कमी कमी होत गेली आहे. तलावाच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलाठी कार्यालयाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.


या संदर्भात प्रसिद्ध झालेली बातमी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला गेला. याला एक महिना होऊन गेला तरीसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


‘...माहिती घेतो’


या प्रकरणी अपर तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तलाठी यांच्याकडून माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर सुद्धा सातत्याने फोन करूनही तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांनी फोन उचलला नाही.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस