लोकल तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू केला असला तरी तिकीट मिळत नसल्याने अडचणी कायम आहेत. यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेल्यांना अद्यापही सरकारने तिकीट देणे सुरू केले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे, तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता केवळ लोकल पास देणेच सुरू केले आहे.


राज्य सरकारने २६ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले होते, त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नियम लागू केले होते. या नियमांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचे पास दिले जात होते. हाच नियम आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांची प्रवासाची अडचण निर्माण झाली आहे. २८ ऑक्टोबर पासून हा निर्णय लागू केल्यानंतर गुरुवारच्या दुपारनंतर लोकलच्या मुंबई तसेच उपनगरातील काही तिकीट खिडक्यांवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना तिकीट देणे बंद केले. यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारीही मोठ्या प्रमाणात तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले. अनेक रेल्वे स्थानकांवर हीच परिस्थिती होती, तर गर्दीदेखील झाली होती.


राज्य सरकारच्या या उलटसुलट निर्णयामुळे नागरीकांना मोठा त्रास होत आहे. जर दोन लसी घेतलेल्यांना विमान प्रवास, मंदिर प्रवेश खुला केला आहे, तर लोकल प्रवासाची सरकार अडचण का करत आहे? असा सवाल मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी केला आहे. दरम्यान दोन लसी घेतलेल्यांना तिकीट उपलब्ध करून द्यावी, अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)