मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून अनेक गोष्टींवरील बंधने हटविण्यात आली आहेत. मात्र, मुंबईत लोकलच्या मर्यादित फेऱ्या सुरू होत्या. आता गुरूवार २८ ऑक्टोबरपासून सर्व लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने सर्व १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, मध्य आणि पश्चिम रेल्वेने १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरीही राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही मुंबईत लोकल प्रवासासाठी हीच अट लागू असणार आहे.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…