प्रत्यक्ष बैठकांना राज्य सरकारची परवानगी

  60

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काही दिवस वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा, सभागृह तसेच सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. मात्र, आता या बैठका प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. यामुळे अखेर भाजपच्या मागणीला यश आले आहे.


कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या बैठका काही दिवसांसाठी प्रत्यक्ष होऊ लागल्या. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यावर बैठका ऑनलाइन होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व बैठका प्रत्यक्ष घेण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. अखेरीस राज्य सरकारनेच आता प्रत्यक्ष बैठका घेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे भाजपच्या मागणीला यश मिळाले आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.


गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काही दिवस वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा, सभागृह तसेच सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. त्याला भाजपचा विरोध होता.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण