मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काही दिवस वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा, सभागृह तसेच सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. मात्र, आता या बैठका प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. यामुळे अखेर भाजपच्या मागणीला यश आले आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर या बैठका काही दिवसांसाठी प्रत्यक्ष होऊ लागल्या. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यावर बैठका ऑनलाइन होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व बैठका प्रत्यक्ष घेण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी न्यायालयातही दाद मागण्यात आली आहे. अखेरीस राज्य सरकारनेच आता प्रत्यक्ष बैठका घेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे भाजपच्या मागणीला यश मिळाले आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काही दिवस वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा, सभागृह तसेच सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. त्याला भाजपचा विरोध होता.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…