विष्णुदास भावे नाट्यगृहात आजपासून तिसरी घंटा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह हे नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्याने सज्ज झाले आहे. या नाट्यगृहाचे रंगमंच व प्रेक्षागृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासून पुन्हा वाजणार आहे.


कोविडची पहिला लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून नाट्यगृहामध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये प्रयोगांना सुरुवात झाली होती. तथापि कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिल महिन्यापासून प्रयोग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा आजपासून नियंत्रित स्वरूपात नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता विष्णुदास भावे नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत कोविड नियमावलीचे पालन करून रसिकांच्या उत्साही प्रतिसादात सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर