विष्णुदास भावे नाट्यगृहात आजपासून तिसरी घंटा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह हे नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्याने सज्ज झाले आहे. या नाट्यगृहाचे रंगमंच व प्रेक्षागृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासून पुन्हा वाजणार आहे.


कोविडची पहिला लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून नाट्यगृहामध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये प्रयोगांना सुरुवात झाली होती. तथापि कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिल महिन्यापासून प्रयोग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा आजपासून नियंत्रित स्वरूपात नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता विष्णुदास भावे नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत कोविड नियमावलीचे पालन करून रसिकांच्या उत्साही प्रतिसादात सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल