विष्णुदास भावे नाट्यगृहात आजपासून तिसरी घंटा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह हे नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नव्याने सज्ज झाले आहे. या नाट्यगृहाचे रंगमंच व प्रेक्षागृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासून पुन्हा वाजणार आहे.


कोविडची पहिला लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून नाट्यगृहामध्ये ५० टक्के उपस्थितीमध्ये प्रयोगांना सुरुवात झाली होती. तथापि कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर एप्रिल महिन्यापासून प्रयोग बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा आजपासून नियंत्रित स्वरूपात नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता विष्णुदास भावे नाट्यगृह एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत कोविड नियमावलीचे पालन करून रसिकांच्या उत्साही प्रतिसादात सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि