निर्बंध शिथिल; पण नियमांचे पालन करा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू होणार आहेतच मात्र त्या पाठोपाठ हॉटेल्स आणि दुकाने उशिरापर्यंत खुली ठेवण्याची देखील परवानगी दिली आहे. मात्र नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.


राज्यासह मुंबईतील हॉटेल्स रात्री १२ तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सध्या काही दिवस सणांचे आहेत. हे सणांचे दिवस लक्षात घेता हे निर्णय घेण्यात आले आहेत. सणांच्या दिवसात हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र ही गर्दी होऊ नये यासाठी दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार हॉटेल्स रात्री १२ तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.


उपाहारगृहे आणि दुकाने जास्त वेळ सुरू ठेवण्याची मागणी होत होती. त्यानुसार त्यांच्या वेळा वाढवण्यात आल्या असून यासोबतच त्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर पालिकेने देखील मुंबईतील दुकाने, रेस्टॉरंट यांच्यासाठी सूचना जाहीर केल्या आहेत. या सगळ्या नियमांमध्ये सूट मिळाली असेल तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.



रेस्टॉरंट, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी


दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
दुकाने, रेस्टॉरंटमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक
फेस मास्क अनिवार्य
सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य
गर्दीवर नियंत्रण

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत