डहाणूखाडी पूल बनला मासे सुकवण्याचा ओटा



डहाणू (वार्ताहर) : डहाणू-पालघर तालुक्याला जोडणाऱ्या खोंडा खाडीवर असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथचा मासळी सुकवण्याचा ओटा केल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय निर्माण झाली आहे.


डहाणू आणि पालघर तालुक्यांना जोडणाऱ्या धाकटी डहाणूच्या खोंडा खाडीवर ४०० मीटर लांबीचा दक्षिणोत्तर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंला जनतेला जाण्या-येण्यासाठी दीड मीटर रुंदीचा फूटपाथ आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालय झाल्याने या पुलावरून हजारो मोठ-मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय, डहाणूच्या रिलायन्स एनर्जीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राख भरून वीस वीस टन वजनाचे डंपर सतत येत जात असतात. त्यामुळे पुलालाच थोका निर्माण झाला आहे,असे असले तरी नागरिक वाहनांच्या भीतीने फुटपाथवरून प्रवास करत असतात.


धाकटी डहाणू येथील काही मच्छीमार महिला या फुटपाथवर बिनदिक्कत करंदी, जवळा, फुकट अशी लहान-लहान मच्छी सुकत टाकून फुटपाथ सतत भरलेला असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची आणि संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यास येणाऱ्या पर्यटकांची फारच अटचण होते. शिवाय, काही लोकांना ह्या सुकत टाकलेल्या माशांचा वास सहन होत नसल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागतो.


आता तर पुलाच्या उत्तरेकडील तडीयाळे तलावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवरच बोंबील मासे सुकवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बांबूच्या माळी (ओलाणी) घालून त्यावर बोंबील सुकवले जातात. मात्र, बोटीतून येणारे ओले बोंबीलाच्या राशी या रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे वाहनांना, प्रवाशांना त्रास होतोच, शिवाय सततच्या पाण्याने या रस्त्यावरही खड्डे पडत असतात याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत