डहाणूखाडी पूल बनला मासे सुकवण्याचा ओटा



डहाणू (वार्ताहर) : डहाणू-पालघर तालुक्याला जोडणाऱ्या खोंडा खाडीवर असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथचा मासळी सुकवण्याचा ओटा केल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय निर्माण झाली आहे.


डहाणू आणि पालघर तालुक्यांना जोडणाऱ्या धाकटी डहाणूच्या खोंडा खाडीवर ४०० मीटर लांबीचा दक्षिणोत्तर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंला जनतेला जाण्या-येण्यासाठी दीड मीटर रुंदीचा फूटपाथ आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालय झाल्याने या पुलावरून हजारो मोठ-मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय, डहाणूच्या रिलायन्स एनर्जीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राख भरून वीस वीस टन वजनाचे डंपर सतत येत जात असतात. त्यामुळे पुलालाच थोका निर्माण झाला आहे,असे असले तरी नागरिक वाहनांच्या भीतीने फुटपाथवरून प्रवास करत असतात.


धाकटी डहाणू येथील काही मच्छीमार महिला या फुटपाथवर बिनदिक्कत करंदी, जवळा, फुकट अशी लहान-लहान मच्छी सुकत टाकून फुटपाथ सतत भरलेला असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची आणि संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यास येणाऱ्या पर्यटकांची फारच अटचण होते. शिवाय, काही लोकांना ह्या सुकत टाकलेल्या माशांचा वास सहन होत नसल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागतो.


आता तर पुलाच्या उत्तरेकडील तडीयाळे तलावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवरच बोंबील मासे सुकवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बांबूच्या माळी (ओलाणी) घालून त्यावर बोंबील सुकवले जातात. मात्र, बोटीतून येणारे ओले बोंबीलाच्या राशी या रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे वाहनांना, प्रवाशांना त्रास होतोच, शिवाय सततच्या पाण्याने या रस्त्यावरही खड्डे पडत असतात याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी