मीरा-भाईंदर सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व

Share

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सहापैकी सहा जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत ९५ नगरसेवक असून त्यात भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेसचे १२ असे संख्याबळ आहे. तर ६ प्रभाग समिती आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सर्व समिती सभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे संख्याबळ प्रत्येक समितीत होते.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन निवडणूक पार पडली. त्यात प्रभाग समिती क्र.१ मध्ये नयना म्हात्रे, प्रभाग २ मध्ये पंकज पांडे, ३ मध्ये गणेश शेट्टी, ४ मध्ये डॉ. प्रीती पाटील, ५ मध्ये अनिल विराणी, तर ६ मध्ये मोहन म्हात्रे असे सहा भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे पिठासन अधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केले. त्यात पंकज पांडे आणि अनिल विराणी बिनविरोध निवडून आले.

Recent Posts

१९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळाले होते? ऐकून वाटेल आश्चर्य

मुंबई: टीम इंडिया(team india) टी-२० वर्ल्डकपची चॅम्पियन ठरली आहे. फायनल सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत…

25 mins ago

Hair Tips: पावसात केस भिजल्यास लगेच करा हे काम, नाहीतर होईल त्रास

मुंबई: पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. या मोसमात प्रत्येकाला आपले आरोग्य, त्वचा तसेच केसांची काळजी घेतली…

1 hour ago

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

3 hours ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

10 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

11 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

12 hours ago