भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सहापैकी सहा जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेत ९५ नगरसेवक असून त्यात भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेसचे १२ असे संख्याबळ आहे. तर ६ प्रभाग समिती आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सर्व समिती सभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे संख्याबळ प्रत्येक समितीत होते.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन निवडणूक पार पडली. त्यात प्रभाग समिती क्र.१ मध्ये नयना म्हात्रे, प्रभाग २ मध्ये पंकज पांडे, ३ मध्ये गणेश शेट्टी, ४ मध्ये डॉ. प्रीती पाटील, ५ मध्ये अनिल विराणी, तर ६ मध्ये मोहन म्हात्रे असे सहा भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे पिठासन अधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केले. त्यात पंकज पांडे आणि अनिल विराणी बिनविरोध निवडून आले.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…