तिसऱ्या लाटेची चिंता कमी; पण नियम पाळा


‘सणांच्या पार्श्वभूमीवर लवकरच टास्क फोर्सची बैठक’




मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईत कोरोनाची भीती कमी झाली आहे. रविवारी मुंबईत शून्य मृत्यू नोंद झाली आहे. यामुळे तिसऱ्या लाटेची चिंता कमी आहे. मात्र असे असताना मुंबईमध्ये पुढे लाट येणार नाही असे होणार नाही. कोरोनाचे नियम सर्वांना पाळावे लागतील, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच येत्या काळात दिवाळी आणि इतर सण येत आहेत त्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


सध्या राज्यात आणि मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट महापालिकेने यशस्वीपणे थोपवली आहे. मात्र असे असताना देखील लाट येणारच नाही असे नाही. येत्या दिवसात दिवाळी आणि इतर सण येत आहेत या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असेही किशोरी पेडणेकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. दरम्यान सध्याच्या चालू परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, तर टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार जारी केलेल्या नियमांचे देखील पालन केले जाणार असल्याचे महापौर यांनी सांगितले.


पुढे त्या म्हणाल्या की, पालिका आणि राज्य सरकारला कोरोना पार्श्वभूमीवर पूर्व तयारी करण्याचेही आदेश दिले जाणार आहेत. एकीकडे तिसरी लाट येऊ नये म्हणून मुंबई तयारी करत आहे. आजमितीस मुंबईत पहिला डोस घेतलेले ९७ टक्के आणि दोन्ही डोस घेतलेले ५५ टक्के लाभार्थी आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असली तरी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.

Comments
Add Comment

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका