कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विस्कळीत झालेले ग्रामीण भागातील जनजीवन आता मूळ पदावर येऊ लागले आहे. पीककापणी, लाकडाच्या मोळी व रानभाज्या विक्री अशा कामांमध्ये आदिवासी पुन्हा रोजगार मिळवू लागला आहे.


गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे व्यवहार ठप्प झाले होते. पण आता कोरोनाविषयक निर्बंध शिथिल झाले असून रेती, वीट, भाताच्या गिरण्या, आठवडे बाजार असे सारे काही सुरू झाल्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांच्या हातांना पुन्हा एकदा रोजगार मिळू लागला आहे. शाळादेखील सुरू झाल्या आहेत. परंतु, पालक व विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आजही वर्ग ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. उद्योगक्षेत्रही रुळावर आल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र सुखावले आहेत. समुद्रीकिनारी असलेल्या मच्छीमार गावातही सध्या आनंदाचे वातावरण असून मत्स्यधनही चांगल्या प्रमाणात मिळत असल्यामुळे मच्छीबाजारसुद्धा चांगलाच तेजीत आला आहे.


शहरी भागांतही अनेक निर्बंध शिथिल झाले असून दुकाने, हॉटेल्स, वाडापावाच्या गाड्या, चहा व पान टपऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमार आता टळली आहे.

Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या