कोरोनानंतर जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विस्कळीत झालेले ग्रामीण भागातील जनजीवन आता मूळ पदावर येऊ लागले आहे. पीककापणी, लाकडाच्या मोळी व रानभाज्या विक्री अशा कामांमध्ये आदिवासी पुन्हा रोजगार मिळवू लागला आहे.


गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे व्यवहार ठप्प झाले होते. पण आता कोरोनाविषयक निर्बंध शिथिल झाले असून रेती, वीट, भाताच्या गिरण्या, आठवडे बाजार असे सारे काही सुरू झाल्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांच्या हातांना पुन्हा एकदा रोजगार मिळू लागला आहे. शाळादेखील सुरू झाल्या आहेत. परंतु, पालक व विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आजही वर्ग ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. उद्योगक्षेत्रही रुळावर आल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र सुखावले आहेत. समुद्रीकिनारी असलेल्या मच्छीमार गावातही सध्या आनंदाचे वातावरण असून मत्स्यधनही चांगल्या प्रमाणात मिळत असल्यामुळे मच्छीबाजारसुद्धा चांगलाच तेजीत आला आहे.


शहरी भागांतही अनेक निर्बंध शिथिल झाले असून दुकाने, हॉटेल्स, वाडापावाच्या गाड्या, चहा व पान टपऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमार आता टळली आहे.

Comments
Add Comment

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क