दिवाळीपासून राणीबाग पर्यटकांसाठी खुली

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीपासून मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता उद्यान म्हणजे राणीबागे खुले होत आहे. यामुळे बच्चे कंपनीसाठी ही दिवाळी खास असणार आहे. मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून राणीबागमध्ये फिरावे लागणार आहे. तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे राणीबाग प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.


फेब्रुवारी महिन्यात राणी बाग सुरू करण्यात आली. मात्र लोकांची गर्दी पाहता तसेच पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर ५ एप्रिलपासून उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने राणीबाग नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.


राणीबाग सुरू करण्याचा निर्णय घेत प्रशासनाकडून कोरोना खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत आराखडाही तयार करण्यात आला आहे. यात मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना लसीची अट घालण्यात आलेली नसली तरी गर्दी वाढल्यास गेट बंद करण्यात येईल, गर्दीवर नियंत्रण आणि पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० सुरक्षा रक्षकांची टीम तैनात केली जाईल. जागोजागी सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. प्राण्यांचे निवासस्थान ग्लासने बंदिस्त असल्याने निकट संपर्क टळणार असून मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दोन डोस घेतलेले असल्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या