सर्वसामान्य मुंबईकरही करू शकतील एसी लोकलने प्रवास

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांना लोकलसेवा १५ ऑगस्टपासून काही अंशी सुरू करण्यात आली आहे. पण आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने इतरांनाही प्रवासाची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात येते.


कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या काळात लोकलसेवा बंद करण्यात आली होती नंतर ती हळूहळू सुरू करण्यात आली. लोकलसेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. अशातच एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना आता एसी लोकलचा प्रवास सुकर होईल. प्रवाशांना तिकीट दरातील तफावत अदा करून या गाडीतून प्रवास करता येईल.


एसी लोकलमधील प्रवासीसंख्या वाढविण्यावर रेल्वेचा भर आहे. त्यानुसार विविध प्रस्तावांवर विचार सुरू आहे. जेव्हा प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात होईल, तेव्हा या तिकीटदराबाबत विचार करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.



सर्वच गाड्या होणार वातानुकूलित?


मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची योजना आखली जात आहे. सर्व उपनगरी गाड्या लोकल वातानुकूलित म्हणजे एसी करण्याचाही रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात येते.


मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणानं मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय याआधीच घेतला आहे. एसी लोकल करण्याबाबत याआधीपासूनच विचार सुरू होता. पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकूलित करण्याची तयारी केली जात आहे.

Comments
Add Comment

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज

सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांचा होणार गौरव

मुंबई : विविध योजनांमधून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवांवरील खर्चाच्या