सर्वसामान्य मुंबईकरही करू शकतील एसी लोकलने प्रवास

  101

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांना लोकलसेवा १५ ऑगस्टपासून काही अंशी सुरू करण्यात आली आहे. पण आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने इतरांनाही प्रवासाची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात येते.


कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या काळात लोकलसेवा बंद करण्यात आली होती नंतर ती हळूहळू सुरू करण्यात आली. लोकलसेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. अशातच एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना आता एसी लोकलचा प्रवास सुकर होईल. प्रवाशांना तिकीट दरातील तफावत अदा करून या गाडीतून प्रवास करता येईल.


एसी लोकलमधील प्रवासीसंख्या वाढविण्यावर रेल्वेचा भर आहे. त्यानुसार विविध प्रस्तावांवर विचार सुरू आहे. जेव्हा प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात होईल, तेव्हा या तिकीटदराबाबत विचार करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.



सर्वच गाड्या होणार वातानुकूलित?


मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची योजना आखली जात आहे. सर्व उपनगरी गाड्या लोकल वातानुकूलित म्हणजे एसी करण्याचाही रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात येते.


मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणानं मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय याआधीच घेतला आहे. एसी लोकल करण्याबाबत याआधीपासूनच विचार सुरू होता. पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकूलित करण्याची तयारी केली जात आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही