सर्वसामान्य मुंबईकरही करू शकतील एसी लोकलने प्रवास

मुंबई (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांना लोकलसेवा १५ ऑगस्टपासून काही अंशी सुरू करण्यात आली आहे. पण आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने इतरांनाही प्रवासाची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. अशातच एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात येते.


कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकाऊन जाहीर करण्यात आले होते. त्या काळात लोकलसेवा बंद करण्यात आली होती नंतर ती हळूहळू सुरू करण्यात आली. लोकलसेवा ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. अशातच एसी लोकलच्या तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाचा आहे. तसे झाल्यास मुंबईकरांना आता एसी लोकलचा प्रवास सुकर होईल. प्रवाशांना तिकीट दरातील तफावत अदा करून या गाडीतून प्रवास करता येईल.


एसी लोकलमधील प्रवासीसंख्या वाढविण्यावर रेल्वेचा भर आहे. त्यानुसार विविध प्रस्तावांवर विचार सुरू आहे. जेव्हा प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात होईल, तेव्हा या तिकीटदराबाबत विचार करता येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.



सर्वच गाड्या होणार वातानुकूलित?


मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची योजना आखली जात आहे. सर्व उपनगरी गाड्या लोकल वातानुकूलित म्हणजे एसी करण्याचाही रेल्वे प्रशासनाचा मानस असल्याचे सांगण्यात येते.


मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणानं मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय याआधीच घेतला आहे. एसी लोकल करण्याबाबत याआधीपासूनच विचार सुरू होता. पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकूलित करण्याची तयारी केली जात आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक