‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर अपघात

  81

पुणे (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळच्या तीव्र उतारावर सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र व भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. बोरघाट (दस्तुरी) महामार्ग


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पो चालकाचे येथील तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो भाजीची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून जोरात आदळला. त्या धक्क्याने भाजीचा टेम्पो पुढच्या कारवर आदळला. टेम्पोच्या धडकेने ही कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मागून आदळली तर तो कोंबड्याचा टेम्पो पुढे एका प्रवासी बसवर जोरात आदळला. तसेच दुसरी एक हुंदाई कार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर आदळल्यावर ती कार मागून येणाऱ्या ट्रेलर आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मध्ये सापडून चिरडली गेल्याने हुंदाई कारचा चालक, अन्य एकजण आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.



अंगावर काटा आणणारे दृश्य


अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले व मृतदेहही बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम