...तर नवाब मलिकांवर मानहानीचा दावा करेन

मुंबई (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे निराधार विधाने करीत आहेत. कोणतेही वक्तव्य करण्याआधी त्यांनी विचार करावा. नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन वानखेडे यांनी दिला आहे.


ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोेने (एनसीबी) धडक कारवाई सुरू केली आहे. अशातच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करण्याचे सत्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरूच ठेवले आहे. फ्लेचर पटेल कोण? त्यांचा वानखेडेंशी काय संबंध, फ्लेचर पटेलसोबत फोटोतली लेडी डॉन कोण? असे अनेक सवाल मलिक यांनी उपस्थित केले आहेत. त्यांच्या या प्रश्नांना यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या पदाचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवे. पुरावे द्या आणि मग बोला, असे यास्मिन वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.


कुणाला बदनाम करण्याचे काम आम्ही करत नाही. जे चांगले काम करतात, त्यांना बदनाम करू नका, असे आवाहन त्यांनी केले.



तर, फ्लेचर पटेल यांनीही नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. मी मलिकांना विनंती करतो की, विनाकारण कोणत्याही सैनिकाचे नाव घेऊ नका. माझा नंबर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे तुमचे कार्यकर्ते आहेतच. तुम्ही मला बोलावूही शकता, तुम्ही मोठे मंत्री आहात. पण कोणत्याही सैनिकाला किंवा गणवेशधारी अधिकाऱ्याला त्यांची कामाप्रती सचोटी दाखवण्यासाठी आपल्या परवानगीची गरज नाही. तुम्ही खरेच ड्रग्जच्या विरोधात आहात तर, समोर या आणि आमच्या मोहिमेला पाठिंबा द्या. आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करा. मी तुमच्याच भागात तुम्हाला दाखवतो की, कुठे कुठे काय काय सापडते, असे त्यांनी म्हटले आहे.



सत्यमेव जयते


नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात