भारताने कोहलीसाठी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकावा

दुबई (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या आयोजनाखालील संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणारा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारताने विराट कोहलीसाठी जिंकावा, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केली आहे.


विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्याच्या नेतृत्वाखालील ट्रॉफी उंचावण्यादृष्टीने प्रत्येक क्रिकेटपटूने प्रयत्न करावेत. यंदाच्या वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताचा संघ प्रबळ दावेदार आहे. त्यातचभारताचे सर्वच क्रिकेटपटू आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळले. वर्ल्डकप युएईत होत असल्याने आयपीएलचा फायदा त्यांना होईल. आयपीएलमुळे युएईतील खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेणे भारताच्या क्रिकेटपटूंना सोपे होईल, असे रैनाने म्हटले आहे. यंदाच्या वर्ल्डकपनंतर टी-ट्वेन्टी प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे.


भारताची बहरलेली आघाडी फळी सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाची ठरेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. त्यात उपकर्णधार रोहित शर्माची बॅटिंग निर्णायक ठरेल, असे त्याने म्हटले.

Comments
Add Comment

IPL 2026 RCB vs CSK : 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार

- जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील

Vinod Kambli : मैदानातील हिरो, आयुष्याच्या खेळपट्टीवर हतबल! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा धोका

आपल्या निर्भीड शैली, आकर्षक रूप आणि क्रिकेटच्या मैदानातील स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा विनोद कांबळी सध्या

Vaishali Rameshbabu : आर. वैशालीचा ऐतिहासिक पराक्रम! ठरली कॅन्डिडेट्स जिंकणारी पहिली भारतीय महिला

मुंबई : भारतीय बुद्धिबळपटू आर. वैशाली (R Vaishali) हिने इतिहास रचत सायप्रसमध्ये झालेली फिडे महिला कॅन्डिडेट्स

IPL 2026 CSK vs KKR : चेन्नईचा चेपॉकवर दबदबा! चेन्नईचा कोलकातावर ३२ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली

IPL 2026 SRH vs RR : विदर्भाच्या प्रफुल हिंगेचा कहर; राजस्थानचा विजयरथ रोखण्यात हैद्राबाद यशस्वी

सोमवार १३ एप्रिल रोजी हैद्राबाद आणि राजस्थान (IPL 2026 SRH vs RR) यांच्यात झालेल्या सामन्यात, हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर

Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८