सर्वांना अभिमान वाटेल असेच काम करेन...

मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या कोठडीत आहे. येथे त्याचे समुपदेशन करण्यात आले असून सर्वांना गर्व वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले


ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.


क्रूझ पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेले आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे, त्यांचे अमली पदार्थ सेवनाने स्वत:वर व समाजावर होणारे दुष्परिणाम यावर एका सामाजिक संस्था आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. आर्यन खान याच्या समुपदेशनावेळी एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे उपस्थित होते. मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनून दाखवेन, चांगली कामे करेन, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना गर्व वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न करेन, असा शब्द आर्यन खानने समुपदेशनावेळी समीर वानखेडे आणि सामाजिक संस्थेला दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.


आर्यन खान आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने अटक केली होती.

Comments
Add Comment

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची