सर्वांना अभिमान वाटेल असेच काम करेन...

मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या कोठडीत आहे. येथे त्याचे समुपदेशन करण्यात आले असून सर्वांना गर्व वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले


ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.


क्रूझ पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेले आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे, त्यांचे अमली पदार्थ सेवनाने स्वत:वर व समाजावर होणारे दुष्परिणाम यावर एका सामाजिक संस्था आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. आर्यन खान याच्या समुपदेशनावेळी एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे उपस्थित होते. मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनून दाखवेन, चांगली कामे करेन, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना गर्व वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न करेन, असा शब्द आर्यन खानने समुपदेशनावेळी समीर वानखेडे आणि सामाजिक संस्थेला दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.


आर्यन खान आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने अटक केली होती.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण