राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसते. दररोज आढळणारी नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. शिवाय, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात १ हजार ६८२ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. तर १ हजार ५५३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१६,९९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३८ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,८९,९८२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३९,७६० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०९,०९,९९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८९,९८२(१०.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३४,८०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात एकूण २९,६२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.